कारचा सांगडाच उरला, २ महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू, इंदापूरमधील अपघाताचे भीषण
पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २६ फेब्रुवारी २०२६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मारुती सुझुकीची इको कार आदळली. या अपघातात दोन महिलाा आणि एक चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर २ तालुका इंदापूर इथं संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर पंक्चर काढण्यासाठी एक ट्रक उभा होता.

त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इको कार ट्रकवर आदळली. या अपघातात आदिती अमर हातेकर (वय २५) आणि त्यांच्या मुलगा जय अमर हातेकर (वय २) आणि सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६० वर्ष ) यांचा मृत्यू झाला. हे सगळं जण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राहणारे होते.
मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी क्रमांक एम एच १२ एक्स ई ८८१६ मधून ७ जण पुण्याच्या दिशेनं जात होते. आयशर ट्रक एम. एच १३ सीयू ५१६३ हा पंक्चर झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या बाजूला उभा होता. हा ट्रॅक धोकादायक परिस्थितीत उभा होता.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगात मारुती सुझुकी इकोच्या चालकाला समोर उभा असलेला ट्रक दिसला. पण, वेग जास्त असल्यामुळे नियंत्रण सुटलं आणि इको कार थेट ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा चुराडा झाला.
इको कार डाव्याबाजूने ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इको गाडी चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०) हे गंभीर जखमी झालेले आहेत.
तर त्यांच्या पत्नी स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४) आणि मुलगी समृद्धी कबीरदास गेजगे (वय १०) हे किरकोळ जखमी झाले आहे.
अपघातग्रस्त ट्रक हा धोकादायक स्थितीत अर्धवट महामार्गावर उभा होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























