पहाटे १ वाजताही सुरू असलेल्या कॅफेंमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण; पोलिसांच्या भेटीनंतरही कॅफे सुरूच – जबाबदारी कोणाची?
कोंढवा परिसरातील एका कॅफेची अवस्था पहाटे १ वाजताही बदललेली नव्हती. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भेट दिली, मात्र त्यानंतरही कॅफे सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कॅफेमुळे परिसरात अनुचित प्रकार, बेकायदेशीर हालचाली व तरुणांची गर्दी वाढत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित पोलीस अधिकारी आणि PMC यंत्रणा कारवाई करत नाहीत, हे धक्कादायक आहे.
आता नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “जर पोलिसांच्या भेटीनंतरही कॅफे बंद होत नसेल, तर मग कायदा कोण पाळणार आणि जबाबदारी कोण घेणार?”
या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशन व महापालिका यांच्याकडून त्वरित स्पष्टीकरण व कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















