बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली महा एल्गार आंदोलनास 30 जून पर्यंत होणार शेतकरी कर्जमाफी
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकऱ्यांचा खरा नेता माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील महा एल्गार आंदोलन यामुळे सरकार झुकलेला आहे . 30 जून 2026 आत शेतकरी कर्जमाफी सह इतर मागण्या मान्य झालेले आहे. या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आला आहे.या आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील 2000 अधिक दिव्यांग बांधव नागपूर येथील आंदोलनात सहभागी झाले त्यात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील ही 200 हून अधिक दिव्यांग बांधव या आंदोलन सहभागी होण्यासाठी राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी वर्गणी करून आंदोलनात जाण्यासाठी आर्थिकनिधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार .यामध्ये राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब राज्य सचिव सुरेश मोकल साहेब राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार तालुकाध्यक्ष योगेश लबडे ,तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर ,तालुका संघटक बाळासाहेब गांडळ , शाखाध्यक्ष माहेगाव भारत आढाव , मूकबधिर संघटनेचे तालुका अध्यक्ष वेनुनाथ आहेर, टाकळी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप भाऊ कड, तालुका सचिव रवींद्र भुजाडी, तालुका संघटक नानासाहेब खपके, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माहेगाव येथील अमोल पवार यांनी ऊन , पाऊस चिखल गर्दी चक्काजाम ,उपासमार आपल्या जीवाची याची पर्वा न करता गर्दी त आंदोलनात मोलाचा सहभाग घेतला त्यामुळे बच्चू भाऊ चे नेतृत्वाखाली वरील मागण्यासाठी यश मिळालं त्याचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला . काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला परंतु शेतकरी ओल्या दुष्काळाने ग्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होणे गरजेचे होते ते यश बच्चुभाऊंच्या नेतृत्व खाली आलेले आहे त्यामुळे आम्ही सर्व बच्चुभाऊ सोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहणार आहोत.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























