“ज्ञानदीप अभियान” — पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (AMS)चा उज्ज्वल उपक्रम “ज्ञानदीप अभियान” — पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (AMS)चा उज्ज्वल उपक्रम
“अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन”कडून शिक्षणासाठी हातभार; भट्टीवाडी शाळेत साहित्य वाटप
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
महाराष्ट्रातील अनेक भागांवर
कोसळलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. वह्या, पुस्तकं, बॅगा आणि पेनच्या अभावामुळे शिक्षण अडथळ्यात आलं. या पार्श्वभूमीवर “अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन” (AMS) ने समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा “ज्ञानदीप अभियान” हा उपक्रम हाती घेतला आहे.
या अभियानांतर्गत पूरग्रस्त भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी दत्तक घेऊन आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य — वह्या, पुस्तके, पेन, बॅग, कंपास बॉक्स — विनामूल्य देण्यात येणार आहे.
भट्टीवाडी शाळेत वाटप, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भट्टीवाडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे AMS टीमने विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. लहानग्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच या मोहिमेचं खरं यश असल्याचं फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षण व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच Ams फाउंडेशनचे अशोक गाडे, संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, श्रीपाद दगडे, भरत सुंबे, संतोष बेरड, सिद्धांत पानसरे तसेच अहिल्यानगर AMS टीम व सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र–गुजरात AMS सभासदांचे योगदान एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक किटचा खर्च सुमारे ₹४०० ते ₹५०० असून, या उपक्रमासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील AMS सभासदांनी आर्थिक तसेच वस्तूरूपात मोठं योगदान दिलं आहे. पुढील टप्प्यात मराठवाडा आणि सोलापूर माढा परिसरातील शाळांनाही मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक येईपर्यंत आमचा प्रवास सुरूच राहील!”
> “ही फक्त सुरुवात आहे; जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक आणि प्रत्येक चेहऱ्यावर हसू दिसत नाही, तोपर्यंत आमचा प्रवास थांबणार नाही,”
असं फाउंडेशनकडून सांगण्यात आलं.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















