“महापालिकेचा ‘पावसाळी डाव’ – पाण्यात डांबर टाकून कोट्यवधींचा खेळ!”
पिंपरी चिंचवड महानगरपालिका – एक नवीन जावईशोध!
शहरात मुसळधार पावसाच्या तडाख्यात असतानाही, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यांवर “पावसाळी डांबरीकरण” करून पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया घालवण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.
रहाटणी, वाकड, आकुर्डी, चिखली, दिघी व इतर भागांत नागरिकांच्या उपस्थितीतच, पावसाच्या पाण्यात डांबर टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. पावसाळ्यात डांबर टिकत नाही हे माहीत असूनसुद्धा हे काम का, असा सवाल निर्माण झाला आहे.
नागरिक म्हणतात, “दरवर्षी डांबर, दरवर्षी खड्डे!”
प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील साटंलोटाचा दुर्गंधी उठवणारा हा प्रकार असून, विकासाच्या नावाखाली टिकाऊपणाचा बळी जात असल्याचे चित्र आहे.
प्रश्न निर्माण होतो – हे डांबर टिकणार किती दिवस? आणि जबाबदार कोण?
महानगरपालिकेने यासंदर्भात तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. अन्यथा यावर तीव्र जनआंदोलन होणार हे निश्चित!
—

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.























