Homeताज्या बातम्यासौ.पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद,...

सौ.पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद, तब्बल 8088 नागरिकांची तपासणी.!

सौ.पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद, तब्बल 8088 नागरिकांची तपासणी.!

थेऊरसह परिसरातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने, आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.

आळंदी, कुंजीरवाडी, थेऊर, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांतील एकूण 8088 नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवला. यातील 5180 नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली, यातील 3924 नागरिकांना मोफत चेसम्यांचे वाटपात करण्यात आले. तसेच 388 नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांचे निदान झाले असून, यातील 80 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून, उर्वरीत शस्त्रक्रिया टप्प्या-टप्प्याने सुरू आहेत. तसेच 9 अपंग बांधवांच्या हात व पायांचे मोजमाप घेऊन, त्यांना काही दिवसात कृत्रिम हात-पाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच 7 नागरिकांवर कान/नाक/घसा तर काही रुग्णांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

गावोगावी फिरून नागरिकांची विचारपूस करून, त्यांच्या आरोग्याच्या गरजा ओळखून थेट तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देणारा हा प्रयत्न ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरला आहे. विशेषतः मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव बसविणे, हाडांचे आजार, डोळे व कान-नाक-घसा तपासणी या सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने अनेकांना तात्काळ उपचार मिळाले.

सौ. पल्लवी युवराज काकडे म्हणाल्या, “शरीर हीच खरी संपत्ती असून, तीचे जतन म्हणजेच आरोग्याची काळजी घेणे, ही काळाची गरज बनली आहे. याचअनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना, गावोगावी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व सवलतीच्या दरात उपचार करून देऊन, गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबांना आधार देणे, हे आमचे ध्येय आहे.

मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा, घरोघरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना असून, या उपक्रमामुळे अनेक नागरिकांचे जीवनमान निरोगी व सुखकर झाले आहे. यामुळे सौ.पल्लवी युवराज काकडे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मोठा हातभार लागला असून, महाआरोग्य शिबिरांच्या या यशस्वी उपक्रमाकडे, ग्रामीण भागात ‘आरोग्य क्रांतीचे एक नवीन पाऊल’ म्हणून बघितले जात आहे.

थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी, 2015 सालापासून, 10 वर्षे अविरतपणे हजारो गोरगरीब रुग्णांना केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे, त्यांना समाजाकडून “आरोग्यदूत” म्हणून संबोधले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेचा कोणताही गट अस्तित्वात नाही : शहा | पुणे बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेचा कोणताही गट अस्तित्वात नाही : शहा | पुणे बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...
error: Content is protected !!