पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ
प्रकल्पाविरोधात गेली अनेक वर्षे शांततामय
आंदोलन करणाऱ्या शोतकऱ्यांचा संयम ज्ञनिवारी (३ मे) अखेर
सुटला. प्रशञासनाच्या ड्रोन सर्व्हेमुळे संतप्त झालेल्या
शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा मारा
केला, ज्यात अनेक रोतकरी, महिला जखमी झाले.यामुळे प्रक्षुब्ध शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगड आणि मातीचे ढेकळे फेकले. आंदोलनादरम्यान कुंभारवळण येथील अंजना महादेव कामथे (वय ५५) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर एखतपूरच्या विमल बाजीराव मोरे जखमी झाल्या. “आमच्या प्रेतांवरूनच विमानतळ होईल,” अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.
शुक्रवारी एखतपूर गावात प्रशासनाने ड्रोन सर्व्हे सुरू केला, पण शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून तो रोखला. सायंकाळी अधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने सर्व्हे पूर्ण केला. शनिवारी उर्वरित गावांचा सर्व्हे सुरू होताच शेतकऱ्यांनी सासवड-वाघापूर मार्गावर वनपुरी चौकात बैलगाड्या लावून नाकाबंदी केली. प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि डीवायएसपी तानाजी बरडे यांच्या फौजफाट्याला कुंभारवळण येथे शेतकऱ्यांनी रोखले. रस्त्यावर लोखंडी खांब टाकून गाड्या अडवण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी खांब हटवत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला.
दुपारी ३ वाजता शेतकऱ्यांनी पोलिसांना मज्जाव केल्याने सौम्य लाठीमारानंतर जोरदार लाठीहल्ला झाला. अश्रुधुराच्या नळकांड्यांनी जमाव पांगवला गेला. यात अनेक तरुण, ज्येष्ठ आणि महिला जखमी झाले. पोलिसांनी ८-१० आंदोलकांना ताब्यात घेतल्याने सायंकाळी ५ वाजता शेतकऱ्यांनी सासवड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. “आटक शेतकऱ्यांना सोडा, गुन्हे दाखल करू नका,” अशी मागणी करत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव आहे

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























