“माधुरी हत्तीचं दुःख समजलं, पण १५ हरणांच्या मृत्यूवर मौन का?”
‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’चा PETA ला थेट सवाल – निवडक प्राणीप्रेम का?
पुणे –
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात १५ हरणांचे मृत्यू हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असूनही, PETA India व इतर प्राणी कल्याण संस्थांनी या प्रकरणावर मौन पाळल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
एकीकडे कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या वेदनेसाठी सुप्रीम कोर्टात लढणाऱ्या संस्था, दुसरीकडे १५ हरणांच्या सामूहिक मृत्यूवर शांत का आहेत? हा परखड सवाल ‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’च्या डॉ. फराह अन्वर हुसैन शेख आणि अनवर शेख यांनी उपस्थित केला आहे.
“निवडक प्राणीप्रेम की केवळ प्रसिद्धीचा हव्यास?”
PETA सारख्या संस्थांनी माधुरी हत्तीच्या मुद्द्यावर भरपूर प्रसिध्दी मिळवली, कोर्टात लढे दिले, प्रसारमाध्यमांचा वापर केला. पण मग पुण्यातील हरणांचे जीवन इतके कमी मोलाचे का?
ही घटना जर खाजगी संस्थेत घडली असती, तर PETA ने आतापर्यंत न्यायालयीन हस्तक्षेप केला असता. पण सरकारी संस्थेतील हलगर्जीपणावर मात्र कोणीच आवाज उठवत नाही, हेच खरे दु:खद आहे.
‘मिस फरा फाउंडेशन’चा सातत्यपूर्ण पाठपुरावा
ही घटना समोर आल्यानंतर ‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’ने Times of India आणि इतर माध्यमांच्या मदतीने आवाज उठवला. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आणि याचिकेचा विचार केला. पण अजूनही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्रमुख मागण्या:
1. स्वतंत्र न्यायालयीन चौकशी – राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी तातडीने करण्यात यावी.
.
—2. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई – अक्षम्य हलगर्जीपणासाठी संबंधितांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई व्हावी.
3. पारदर्शकता आणि समानता – PETA व इतर संस्थांनी त्यांच्या कामात सर्व प्राण्यांना समान न्याय देण्याचा दृष्टिकोन ठेवावा.
आमचा निर्धार:
‘मिस फरा चॅरिटेबल फाउंडेशन’ प्राणी हक्क, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्वासाठी लढत राहील. जोपर्यंत हरणांच्या मृत्यूला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
> “प्राणी कल्याण हे प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नसून एक नैतिक कर्तव्य आहे!”

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















