अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे ठार तर कृष्णा गोल्हार जखमी
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
शिवाजी दवणे 9730170965
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी अपघात झाले. डिग्रस फाटा परिसरात झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला तर शिंगणापूर फाटा परिसरात झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे हे जागीच ठार झाल्याची घटना समोर आली.
शशिकांत तुकाराम दुधाडे, वय ६५ वर्षे, रा. मुंजोबा नगर, राहुरी हे आज दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजे दरम्यान त्यांच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवर विद्यापीठ येथे गेले होते. नातवाला शाळेत सोडल्यानंतर शशिकांत दुधाडे हे मोटर सायकलवर विद्यापीठ कडून राहुरीकडे येत असताना नगर मनमाड महामार्गावर धरमाडी गेस्ट हाऊस जवळ त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत शशिकांत दुधाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांना तातडीने राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या दरम्यान राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार, वय २२ वर्षे, हा तरुण तो अपघात पाहण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवर जात असताना शनी शिंगणापूर फाटा परिसरात त्याच्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत कृष्णा गोल्हार हा गंभीर जखमी झाला असून त्याला अहिल्यानगरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शशिकांत दुधाडे यांच्या अपघाताची माहिती समजतात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे संचालक हर्षद तनपुरे, आर आर तनपुरे, नंदूभाऊ तनपुरे, गजानन सातभाई, राजेंद्र बोरकर, राजेंद्र दुधाडे, किशोर दुधाडे, पप्पू कोरडे, कांता तनपुरे, संतोष आघाव, पांडूभाऊ उदावंत आदीसह शेकडो नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
मयत शशिकांत दुधाडे हे शहरातील डाॅ. सुहास दुधाडे व संकेत दुधाडे यांचे वडील होत. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र नगर मनमाड महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून मृतांची देखील संख्या वाढली. गेल्या पंधरा दिवसात राहुरी तालुका हद्दीत विविध ठिकाणी अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झालाय. यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























