भावपूर्ण आदरांजली…!! जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन
श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, कष्टकऱ्यांचे खंदे नेते आणि हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
“एक गाव, एक पाणवठा” या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व करून सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या बाबा आढाव यांच्या कार्याची परंपरा आजही समाजाला दिशा देणारी ठरली आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती, तळागाळातील माणसांच्या हक्कांसाठी सातत्याने केलेली लढाई आणि समतेच्या विचारांचा प्रसार हे त्यांचे आयुष्यभराचे ध्येय.
बाबा आढाव यांनी शरीर सोडले असले तरी त्यांच्या विचारांची क्रांती, समाजपरिवर्तनाची तळमळ आणि श्रमिकांच्या प्रश्नांवरील लढाई पुढील पिढ्यांना मार्गदर्शक राहील.
त्यांच्या आत्म्यास
कम्मास सद्गती, सुगती, निर्वाण लाभो…
अखेरीचा जय भीम… जय संविधान…!!

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























