शिरूर–हवेली मतदारसंघासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर : ग्रामीण- शहरी रस्त्यांना नवी उभारी
शिरूर (पुणे) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिरूर व हवेली विधानसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आमदार माऊली आबा कटके यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे विविध ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शिरूर व हवेली तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गांचे मजबुतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. शिरूर–निमोणे–गुणाट–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (रा.म. ९) या प्रजिमा ५३ मार्गाच्या सुधारणा कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मलठण–ढोकसांगवी–कोरेगावकडे जाणाऱ्या निमोणे मार्गाच्या (प्रजिमा ११४) किमी दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.
याशिवाय मिरवडी–दहिटणे–राहू–वाळकी संगम ते रांजणगाव सांडस–नागरगाव–कुरळी (प्रजिमा ११३) या मार्गावरील रस्त्याचे किमी दरम्यान रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच आरणगाव–आलेगाव मार्गावरील वडगाव रासाई–सादलगाव–मांडवगण फराटा–गणेगाव तांदळी (प्रजिमा ४०) या रस्त्याच्या कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर न्हावरे–चिंचणी (प्रजिमा ५९) या मार्गावरील रस्त्याच्या किमी दरम्यान मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तसेच शिरूर–निमोणे–निर्वी–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (प्रजिमा ५३) या परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.
दरम्यान, हवेली तालुक्यातीलही काही महत्त्वाच्या रस्त्यांना या निधीतून चालना मिळणार आहे. वाघोली–भावडी–तुळापूर (प्रजिमा १६६) या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव–भिवरी–वाडेबोल्हाई–डोंगरगाव–पेरणे फाटा–वढू बुद्रुक ते वढू खुर्द (प्रजिमा १९ / प्रजिमा २२६) या मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण, सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठीही शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विविध रस्त्यांच्या कामांमुळे शिरूर व हवेली तालुक्यातील गावांमधील दळणवळण अधिक सुकर होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राशी जोडणी अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार माऊली आबा कटके यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात या कामांना गती मिळाल्यास ग्रामीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























