आहिल्यानगर : ताकद आणि चपळाईचा खेळ म्हणून कुस्ती खेळाची ओळख आहे. परंतु याच कुस्ती खेळाला गालबोट लावण्याचे काम डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने केले. पंचाचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षे याने आधी पंचांची कॉलर पकडली आणि नंतत त्यांना लाथेने मारले.हा सर्व प्रकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारमधील चार कॅबिनेट मंत्र्यांसमोर घडला.वाडिया पार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ आणि अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे अंतिम तीन सामना संपन्न होण्याआधीच पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील सामन्यादरम्यान तुफान राडा झाला.मैदानात नेमकं काय घडलं?पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात रोमहर्षक सामना सुरू असताना मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित करून सामना पृथ्वीराजने जिंकल्याचे घोषित केले. पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोषाला सुरुवात केली.रागाने लालबुंद झालेल्या शिवराज राक्षेने पंचाची कॉत्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडली. एवढ्यावरच न थांबता त्याने पंचांना लाथही मारली. शिवराज आणि पंचांमध्ये झटापट सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर मध्यस्थी केली.माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले?माझे दोन्ही खांदे टेकलेच नाहीत, माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले? अशी विचारणा शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तुम्ही निर्णय देताना खेळ भावना दाखवली नाही, अशी तक्रार शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तसेच पंचांनी माझ्यावर अन्याय केल्याची भावना शिवराज राक्षेने बोलून दाखवली.महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील वादावर काय म्हणाला?असा प्रकार कधीच झाला नाही पण तो का झाला याचा देखील विचार केला पाहिजे. पंचांना निकाल देण्याची घाई करण्याची गरज नव्हती. शिवराज राक्षेला आक्षेप नोंदवण्याची संधीच मिळाली नाही. गोष्टी क्लिअर करून निकाल दिमिळाली नाही. गोष्टी क्लिअर करून निकाल दिला पाहिजे होता. व्हिडिओ पाहून दोन्ही खेळाडूंना गोष्टी समजावून मग निकाल दिला पाहिजे होता.नियमानुसार दोन्ही खांदे टेकले पाहिजे. व्हिडिओत तरी एकच खांदा टेकला आहे. ही घटना कशामुळे झाले हे कळत नाही, असे चंद्रहार पाटील म्हणाला स्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















