कात्रजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक ‘सदिच्छा समारंभ’ उत्साहात संपन्न
पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६ महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था संचलित गगनगिरी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, संतोष नगर, कात्रज येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा “सदिच्छा समारंभ” अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मानसिक बळ, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या समारंभातून करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. अल्पना वैद्य (Head, Department of Psychology, Symbiosis College of Arts & Commerce, Pune) यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळातील ताणतणाव कसा हाताळावा, अपयशाची भीती कशी दूर करावी आणि स्वतःवर विश्वास कसा ठेवावा याबाबत अत्यंत सोप्या व प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले.
“यश म्हणजे फक्त गुण नव्हे, तर तुमची जिद्द आणि प्रयत्न हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाला श्री. अर्जुन शिर्के सर मुख्याध्यापक हिरामण बनकर माध्यमिक विद्यालय, श्री कोळपकर सर वरिष्ठ शिक्षक हिरामण बनकर माध्यमिक विद्यालय, सौ. सुधा कांबळे मुख्याध्यापिका हुजूरपागा माध्यमिक विद्यालय कात्रज, प्रतिमाताई खांडेकर सेक्रेटरी भारत विकास परिषद, सक्सेस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संस्थापक श्री. सागर गवळी सर, श्री. नेवासकर सर संस्थापक मणिभद्र कॉम्प्युटर, संस्थेचे संस्थापक श्री. रतन माळी सर, संस्था अध्यक्षा सौ. स्मिताताई वाघ यांची विशेष उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “शाळा म्हणजे आमच्यासाठी दुसरे घर आहे,” असे भावनिक शब्द अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी शुभेच्छा देताना त्यांच्यावर कायम आशीर्वाद आणि विश्वास असल्याचे सांगितले.
हसत-खेळत, आठवणींनी ओथंबलेल्या वातावरणात पार पडलेला हा सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी कोरला जाईल, यात शंका नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षका सौ.पाटील मॅडम व इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले. आभार गगनगिरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी मानले. गगनगिरी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























