Homeताज्या बातम्यासंतोष शिंदे' ची व राजुमामा तागड ची गुगली 'मिरी'करांना भावली

संतोष शिंदे’ ची व राजुमामा तागड ची गुगली ‘मिरी’करांना भावली

संतोष शिंदे’ ची व राजुमामा तागड ची गुगली
‘मिरी’करांना भावली

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
राजकारण करत असताना फक्त सत्तेचे राजकारण न करता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राजकारण करणं अत्यंत गरजेचं असतं आणि सर्वसामान्यांसाठी जो राजकारण करतो तोच राजकारणात टिकतो असं म्हणतात नक्की याच म्हणीप्रमाणे मिरी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मिरी गावचे माजी सरपंच संतोष शिंदे यांनी खऱ्या अर्थाने मिरी ग्रामस्थांचे हित कशामध्ये आहे ते पाहिलं आणि आंदोलनात सहभागी झाले.आंदोलनात सहभागी होताना पाणी प्रश्न,राजकारणातील कुरघोडी तसेच पाण्यासाठी धडपडत असलेली जनता याचा विचार करत आमदार तनपुरे यांनी पुकारलेल्या रास्ता रोको मध्ये सहभागी होत एक गुगली टाकली हीच ‘ संतोष ‘ची व राजुमामा ची गुगली ‘ ‘ मिरी ‘करांना चांगलीच भावली असल्याचे दिसून येत आहे.
मित्र हो मिरी ग्रामस्थांसाठी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी निश्चितपणे मोठे योगदान दिलेले आहे . तसेच राजुमामा तागड यांनी नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून वेळोवेळी मिरी गावासाठी मोठा निधीही त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. निधी मिळवून देण्यात संतोष शिंदे व राजुमामा तागड यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तर माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटीची स्वतंत्र योजना मंजूर केली.मात्र गेल्या काही दिवसापासून मिरीत पाणी टंचाई निर्माण झाली. सध्या उद्भवलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन संतोष शिंदे स्वस्त बसलेले नाहीत . त्यांनीही त्यांच्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्याला जरी यश आले नाही तरीही जो मिरी ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न हातात घेतो किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यालाच साथ देत ग्रामस्थांना पाणी मिळालं पाहिजे हा एकमेव उदात्त हेतू घेऊन काल झालेल्या पाण्यासाठीच्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होत आपण ग्रामस्थांच्या भल्याचा विचार करतो हे दाखवून दिले . कालचे आंदोलन जरी माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली असले तरीही ते ग्रामस्थांच्या हिताचे होते. मिरी ग्रामस्थांना पाणी मिळावे यासाठी होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संतोषी शिंदे ,राजुमामा तागड तथा अनेक राजकीय नेते राजकीय जोडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी झाले. संतोष शिंदे यांच्याप्रमाणेच राजुमामा तागड असतील किंवा इतर नेते असतील त्यांचे खऱ्या अर्थानं अभिनंदन केले पाहिजे. शेवटी आपण आपल्या गावाच्या भाल्याचाच विचार करतो आणि तो विचार करत असताना कोण कोणत्या पक्षाचा कोणकोणत्या पार्टीचा हा विचार न करता गावाला पाणी मिळावे हा एकमेव उदात्त हेतू ठेवून हे लोक पुढे आलेले असतात. म्हणून या सर्वच ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन व्हायला हवे.संतोष शिंदे यांनी अशा पद्धतीने भूमिका घेत पाणी टंचाईला जबाबदार असणाऱ्या विरोधातही एल्गार एल्गार पुकारला त्यामुळे खऱ्या अर्थाने कालच्या आंदोलनाचे सर्वच मिरी ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.
प्राजक्त तनपुरे असतील तथा नामदार विखे पाटील व अक्षय कर्डिले असतील यांच्या माध्यमातून लवकरच पाणी प्रश्न सुटेल अशी मिरी ग्रामस्थांना अपेक्षा आहे. सध्या प्राजक दादा तनपुरे यांच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा राजुमामा तागड यांच्या सौर पंपाद्वारे चालू आहे सर्वच सहभागी झालेल्या व मिरी गावाला पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करीत असलेल्या मिरी ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...
error: Content is protected !!