माढा व करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय हवामान खात्याने (मुंबई कोलॅब) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अहमदनगर व धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीना कोलगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगवती नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पूरस्थितीमुळे करमाळा व माढा तालुक्यातील खालील गावांमध्ये पाणी शिरलेले असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे :
➡️ करमाळा तालुका – निलज, बोरगाव, खडकी, बितरगाव श्री, तरटगाव, अलजापूर, अवती, पोटेगाव, बाळेवाडी, लाहू, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, पापनस, रिधोरे, तंदुळवाडी, निमगाव मा. महातपूर, दारफळ, सुलतानपूर (राहुलनगर), केवड, उंदरगाव, वाकव, खैरव, कुंभेज, लोणी, कावे, महादेववाडी, म्हैसगाव, मानेगाव.
➡️ माधा तालुका – वरील गावांमध्ये पूरपाणी शिरलेले असून, संपूर्ण वस्त्यांमध्ये धोका निर्माण झालेला आहे.
🔹 हवामान खात्याने 26, 27 व 28 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर, अहमदनगर व धाराशिव जिल्ह्यात आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच, पाण्यामुळे विषारी साप, विंचू आदी प्राणी वस्त्यांमध्ये घुसण्याचा धोका आहे.
🔹 त्यामुळे सीना नदीकाठी व आसपासच्या वस्त्यांमधील सर्व नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचा आदेश मा. उपविभागीय अधिकारी, माधा विभाग, कुडुवाडी सौ. जयश्री अवहाद यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (3) अन्वये दिला आहे.
👉 आदेशानुसार, पूरपाण्याने वेढलेल्या वस्त्यांमध्ये किंवा पूराच्या पाण्याच्या उच्चतम पातळीपासून 500 मीटर परिसरात पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशबंदी लागू राहील.
👉 सर्व नागरिकांनी हा आदेश गांभीर्याने घ्यावा. अन्यथा, आदेश मोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
🛑 सर्व नागरिकांना आवाहन :
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी हलवावे. पूरग्रस्त भागात अनावश्यक प्रवेश करु नये. जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करावे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























